आजचे विचारवेध...मनुष्याने आपल्या जीवनात परिस्थिती वेगवेगळी रूपे घेऊन आपली परीक्षा घेत असते.त्या परीक्षेत जीवनात कधी दु:खाचे,कधी सुखाचे तर कधी न सुटणारेही अवघड प्रश्न येतात आणि त्याच्या मानसिकतेनुसार,
अनुभवानुसार सोडविण्याचा प्रयत्न करतात.जर समजा प्रयत्न नाहीच केला तर जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होता येत नाही.जर व्हायचेच असेल तर समोर येणा-या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्याची मानसिकता तयार करावी लागेल आणि न घाबरता ,न डगमगता मन संयमीत ठेऊन सदविवेक बुध्दीने सारासार विचार करून धैर्याने आणि हिंमतीने हाताळायला शिकले तरच जीवनाच्या ख-या परीक्षेत यशस्वी होता येईल हे तितकेच सत्य आहे.
व्यंकटेश काटकर
No comments:
Post a Comment