प्रार्थणा
हे दयाघना शक्ती दे
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना
विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
बोधकथा
पुण्यवान माणस
एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती .
आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .
एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह
मुसळधार पावसाची सुरुवात झाली. ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी
सैरभैर पळु लागले .
अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.
म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला.
प्रत्येकजण
आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने पैज लावली . बाहेर विजा
पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे
ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो
पुण्यवान.
प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला
शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. आणि
सर्वजण सुखरुप झोपडीत आले.
आता पाळी आली म्हतारी
आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर
पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार
करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले
त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते
चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.
तात्पर्य
एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.

No comments:
Post a Comment